पानिपत मराठी कादंबरी
कथा.. पानिपतच्या मराठा युद्धकैद्यांची!
२२ हजार मराठी युद्धकैदी गुलाम म्हणून अहमदशहा अब्दालीने आपल्याबरोबर अफगाणिस्तानात नेले.
पानिपतचे तिसरे युद्ध होऊन आता अडीचशे वषेर्ं उलटली असली तरी अजूनही पानिपत हा मराठी माणसाच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. या युद्धात जवळपास चाळीस हजार मराठी योद्धे, तसेच स्त्रिया व पुरुष मरण पावले आणि २२ हजार मराठी युद्धकैदी गुलाम म्हणून अहमदशहा अब्दालीने आपल्याबरोबर अफगाणिस्तानात नेले. युद्धानंतर मराठी युद्धकैद्यांच्या लांबच लाब रांगा केल्या गेल्या व त्यांना अफगाण सन्याबरोबर दिल्ली, मथुरा इत्यादी ठिकाणी नेण्यात आले. इतिहासात पानिपतच्या या दुर्दैवी युद्धकैद्यांविषयी जे थोडेफार उल्लेख आढळतात त्यापकी एक उल्लेख सियार उल मुत्ताखिरीन या इतिहासकाराने अशा तऱ्हेने वर्णन केलेला आहे : ‘दु:खी युद्धकैद्यांच्या लांबच लांब रांगा करण्यात आल्या आणि त्यांना थोडेबहुत र्अधकच्चे अन्न व पाणी देण्यात आले. युद्ध संपल्यावर जे काही पुरुष, स्त्रिया आणि लहान मुले वाचली त्यांना गुलाम म्हणून नेण्यात आले. अंदाजे बावीस हजार. त्यातले बरेचसे लोक मोठय़ा हुद्दय़ावरचे होते
पानिपतचे युद्ध कसे लढले गेले याविषयी इतिहासात सविस्तर माहिती उपलब्ध आहे; परंतु त्यानंतर मराठी युद्धकैद्यांचे पुढे काय झाले याविषयी काहीच माहिती उपलब्ध नाही. या युद्धकैद्यांचा पानिपतानंतरचा प्रवास व त्यांच्या वंशजांची सध्याची परिस्थिती याविषयीची माहिती इतिहासाचा एक हौशी संशोधक म्हणून फेसबुकच्या माध्यमातून आणि पानिपतावरील युद्धकैद्यांच्या वंशजांबरोबर केलेल्या संभाषणातून मला मिळाली.
पानिपतच्या युद्धानंतर दोन महिन्यांनी.. म्हणजे २० मार्च १७६१ रोजी अहमदशहा अब्दाली अफगाणिस्तानात जाण्यासाठी दिल्लीहून निघाला. त्याच्यासोबत मराठे युद्धकैदीही होते. परत जाताना पंजाबमध्ये शिखांनी या युद्धकैद्यांपकी काही मराठी स्त्रियांना मुक्त केले, अशी इतिहासात नोंद सापडते. पश्चिम पंजाब (पाकिस्तान) ओलांडल्यानंतर बलुचिस्तान प्रांतातील डेरा बुगटी आदी भाग सुरू होतो. पानिपतच्या युद्धात बलुची सन्य अब्दालीच्या बाजूने लढले होते. पानिपत युद्धाच्या एक महिना अगोदर १५,००० बलुची घोडदळ अताईखान याच्या नेतृत्वाखाली अब्दालीला येऊन मिळाले. त्यामुळे अब्दालीची बाजू बळकट झाली होती. पानिपताच्या युद्धापूर्वी तीन वर्षे आधी १७५८ मध्ये अब्दाली आणि बलुचिस्तानचा त्यावेळचा शासक मीर नासीर खान नुरी (कलातचा खान) यांच्यामध्ये एक तह झालेला होता. या तहाच्या अटीनुसार मीर नासीर खान नुरीने अब्दालीला त्याच्या लष्करी कारवायांत सनिक पुरवायचे व त्या बदल्यात अब्दाली मीर नासीर खानाला सन्य ठेवण्यासाठी आíथक मदत करेल असे ठरले होते. अब्दाली जेव्हा पंजाब ओलांडून बलुचिस्तानात परत आला त्यावेळेस कलातच्या खानाने अब्दालीकडे सन्य पुरविण्याच्या बदल्यात आíथक मोबदला मागितला. परंतु अब्दालीला हिन्दुस्थानात फारशी रक्कम खंडणी म्हणून मिळाली नव्हती. कारण दिल्लीचा बादशहा सततच्या आक्रमणांमुळे तसा कफल्लकच झालेला होता. आणि मराठय़ांकडूनदेखील युद्धात हत्ती, घोडे आणि तोफांव्यतिरिक्त काहीच आíथक घबाड पदरात पडले नव्हते. त्यामुळे अब्दालीने मराठा युद्धकैदीच पशांऐवजी मोबदला म्हणून बलोच सरदारांना सुपूर्द केले. मराठा युद्धकैदी बलोच लोकांना देण्याचे दुसरे कारण म्हणजे मराठा युद्धकैद्यांची त्यावेळची शारीरिक अवस्था हीदेखील असू शकते. युद्धकैदी जवळपास दोन-तीन महिने कैदेत होते आणि त्यांना अगदी तुटपुंज्या अन्नपाण्यावर दिवस काढावे लागले होते. अजून बोलन िखडीसारख्या अतिशय अवघड व दुर्गम भागातून पुढचा प्रवास करायचा होता. अगोदरच मानसिक व शारीरिकदृष्टय़ा खालावलेल्या मराठय़ांना या प्रदेशातून आणखी प्रवास जिवावर बेतला असता. त्यामुळेच अब्दालीने हा पुढचा विचार करून मराठय़ांना बलोच सरदारांना देऊन टाकले.
पानिपतात लढलेले बलुची सन्य हे वेगवेगळ्या बलुची जमातींनी बनलेले होते. त्यामुळे मराठे युद्धकैदीही पानिपतात लढलेल्या निरनिराळ्या बलुची जमातींना विभागून देण्यात आले. मराठा युद्धकैद्यांची संख्याही बरीच मोठी होती. आणि सगळ्या मराठय़ांना एकाच ठिकाणी ठेवण्यात मोठा धोकाही होता. त्यामुळे या युद्धकैद्यांना विभागण्याचा निर्णय मीर नासीर खान नुरी याने घेतला.
श्री. विश्वास पाटील यांची 'पानिपत' ही कादंबरी केवळ आणखी एक ऐतिहासिक कादंबरी कादंबरी नाही. ती वेगळ्या प्रकृतीची ऐतिहासिक कादंबरी आहे. तिला प्राणभूत असलेली जाणीवही गंभीर आधुनिक मनाची जाणीव आहे. बहुसंख्य ऐतिहासिक कादंबर्या या गतकालचा गौरव करणार्या आणि ऐतिहासिक मनोवृत्तीचा अंगिकार करणार्या असतात. भूतकालात वर्तमान शोधणार्या अगर भूत, वर्तमान, भविष्य यांच्यातील अनुसंधान पाहणार्या नसतात. हे घडण्यासाठी ऐतिहासिक घटनांचा अन्वयार्थ तपासणारे भान सतत जागे असावे लागते. श्री. विश्वास पाटील हे भान बाळगतात. त्यामुळे 'पानिपत'मध्ये एकमेकात गुंतलेली ऐतिहासिक घटनांची मालिका, उन्हापावसात, थंडीवार्यात शेकडो कोस मोहिमेवर निघालेले लढाऊ दल आणि लवाजमे, राजकारणातले डावपेच, खलबते, स्वार्थलोभ, वासनाविकार, ऐतिहासिक व्यक्तींची खाजगी, सार्वजनिक स्वप्ने, रोमहर्षक घटना आणि दैवगतीचे उलटेसुलटे पलटे, किल्ले, तटबंद्या, नद्यानाले, पिकांनी श्रीमंत झालेली भूमी यांची
ठसठशीत वर्णने तर आहेतच पण त्याबरोबर विशिष्ट समाजाचे, वंशाचे आणि जातीजमातीचे उपजत स्वभावविशेष आणि गुणदोष यांची थक्क करणारी जाण आहे. ही जाण या कादंबरीच्या गुणवत्तेचे मर्म आहे. त्यामुळेच ही ऐतिहासिक कादंबरी म्हणजे राष्ट्रधर्म ओळखणार्या एका आधुनिक मनाने घेतलेला एक गतकाळचा शोध असे जाणवते
पानिपतने केवळ लोकप्रियतेचा इतिहास निर्माण केलेला नाही. यावर्षीचे 'प्रियदर्शिनी' पारितोषिक या कादंबरीला मिळाले ही रसिक मान्यतेची आणि चिकित्सक पसंतीची निशाणी आहे. कादंबरीच्या बहुमुखी गुणवत्तेचा तो उचित गौरव आहे. श्री. विश्वास पाटील यांच्या भावी साहित्यकृतींच्या गुणवत्तेला केलेले ते एक आवाहन ही आहे. त्यांच्या लेखणीचा श्वास मोठा असल्याने या आवाहनाला ते योग्य प्रतिसाद देतील असा भरंवसा वाटतो.
-- म. द. हातकणंगलेकर
'पानिपत' महाकाव्याच्या तोलामोलाची कादंबरी. ... बावनकशी ऐतिहासिक कृती. लेखकाची सर्वसाक्षी उपस्थिती व दोनी बाजूंची तुल्यबळ पेशकश. समग्र मानवी अस्तित्वाचे आणि गूढ भवितव्याचे भान देणारी, उदात्त अतिमानुष मूल्ये उद्घोशित करणारी, कालस्वराची नेमकी लय पकडणारी भव्य अनुभूती ...
-- शंकर सारडा
पानिपतात लढलेले बलुची सन्य हे वेगवेगळ्या बलुची जमातींनी बनलेले होते. त्यामुळे मराठे युद्धकैदीही पानिपतात लढलेल्या निरनिराळ्या बलुची जमातींना विभागून देण्यात आले. मराठा युद्धकैद्यांची संख्याही बरीच मोठी होती. आणि सगळ्या मराठय़ांना एकाच ठिकाणी ठेवण्यात मोठा धोकाही होता. त्यामुळे या युद्धकैद्यांना विभागण्याचा निर्णय मीर नासीर खान नुरी याने घेतला.
श्री. विश्वास पाटील यांची 'पानिपत' ही कादंबरी केवळ आणखी एक ऐतिहासिक कादंबरी कादंबरी नाही. ती वेगळ्या प्रकृतीची ऐतिहासिक कादंबरी आहे. तिला प्राणभूत असलेली जाणीवही गंभीर आधुनिक मनाची जाणीव आहे. बहुसंख्य ऐतिहासिक कादंबर्या या गतकालचा गौरव करणार्या आणि ऐतिहासिक मनोवृत्तीचा अंगिकार करणार्या असतात. भूतकालात वर्तमान शोधणार्या अगर भूत, वर्तमान, भविष्य यांच्यातील अनुसंधान पाहणार्या नसतात. हे घडण्यासाठी ऐतिहासिक घटनांचा अन्वयार्थ तपासणारे भान सतत जागे असावे लागते. श्री. विश्वास पाटील हे भान बाळगतात. त्यामुळे 'पानिपत'मध्ये एकमेकात गुंतलेली ऐतिहासिक घटनांची मालिका, उन्हापावसात, थंडीवार्यात शेकडो कोस मोहिमेवर निघालेले लढाऊ दल आणि लवाजमे, राजकारणातले डावपेच, खलबते, स्वार्थलोभ, वासनाविकार, ऐतिहासिक व्यक्तींची खाजगी, सार्वजनिक स्वप्ने, रोमहर्षक घटना आणि दैवगतीचे उलटेसुलटे पलटे, किल्ले, तटबंद्या, नद्यानाले, पिकांनी श्रीमंत झालेली भूमी यांची
ठसठशीत वर्णने तर आहेतच पण त्याबरोबर विशिष्ट समाजाचे, वंशाचे आणि जातीजमातीचे उपजत स्वभावविशेष आणि गुणदोष यांची थक्क करणारी जाण आहे. ही जाण या कादंबरीच्या गुणवत्तेचे मर्म आहे. त्यामुळेच ही ऐतिहासिक कादंबरी म्हणजे राष्ट्रधर्म ओळखणार्या एका आधुनिक मनाने घेतलेला एक गतकाळचा शोध असे जाणवते
पानिपतने केवळ लोकप्रियतेचा इतिहास निर्माण केलेला नाही. यावर्षीचे 'प्रियदर्शिनी' पारितोषिक या कादंबरीला मिळाले ही रसिक मान्यतेची आणि चिकित्सक पसंतीची निशाणी आहे. कादंबरीच्या बहुमुखी गुणवत्तेचा तो उचित गौरव आहे. श्री. विश्वास पाटील यांच्या भावी साहित्यकृतींच्या गुणवत्तेला केलेले ते एक आवाहन ही आहे. त्यांच्या लेखणीचा श्वास मोठा असल्याने या आवाहनाला ते योग्य प्रतिसाद देतील असा भरंवसा वाटतो.
-- म. द. हातकणंगलेकर
'पानिपत' महाकाव्याच्या तोलामोलाची कादंबरी. ... बावनकशी ऐतिहासिक कृती. लेखकाची सर्वसाक्षी उपस्थिती व दोनी बाजूंची तुल्यबळ पेशकश. समग्र मानवी अस्तित्वाचे आणि गूढ भवितव्याचे भान देणारी, उदात्त अतिमानुष मूल्ये उद्घोशित करणारी, कालस्वराची नेमकी लय पकडणारी भव्य अनुभूती ...
-- शंकर सारडा
पानिपतची तिसरी लढाई
पानिपतची तिसरी लढाई जानेवारी १४ १७६१ रोजी भारतातील हरियाणा राज्यातील पानिपत जवळ झाली. याच गावाजवळ पहिली दोन युद्धे झाली होती, ज्यात मुघलांची सरशी झाली होती व भारतात मुघल सत्तेचा पाया घातला गेला होता. तिसरी लढाई अफगाण सेनानी अहमदशाह अब्दाली आणि महाराष्ट्रातील मराठ्यांत झाली. अहमदशाह अब्दालीने पेशव्यांचा व पर्यायाने मराठी साम्राज्याचा मोठा पराभव केला. या पराभवानंतर मराठा साम्राज्याची एकसंधता नष्ट झाली. जरी महाराष्ट्रातील सत्ता पेशव्यांकडे राहिली असली तरी महाराष्ट्राबाहेरचे साम्राज्य अनेक सरदारांनी आपापल्यात वाटून घेतले.
Comments
Post a Comment